
शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार योजनेत सहभागासाठी २३ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
याआधीची मुदत ही 15 जुलै देण्यात आली होती.पण अनेक शेतकऱ्यांकडून योजनेशी संबंधित औपचारिक अपूर्ण राहिल्याने महाराष्ट्रात ही मुदतवाढ देण्यात आली. आता 23 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत सहभागी होता येणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी याबाबत आदेशाचे पत्र जाहीर केले आहे
More Stories
विशेष लेख:- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण: बेघर व्यक्तीसाठी एक महत्त्वकांक्षी योजना
उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक, बापूसाहेब चोबे यांनी केले शक्तीप्रदर्शन
निष्पक्ष पत्रकारिता काळाची गरज : इंडिया टुडे, वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे