
सोलापूर : सोलापुरातील नामांकित कंपनी बालाजी अमाईन्सने आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत पूरग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने दि २९ जुलै २०२१ रोजी रु १ कोटीचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला.
कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने CSR अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने आजपर्यंत शिक्षण,क्रिडा आरोग्य व स्वछता , जलपुरवठा व जल संवर्धन क्षेत्रात आपले योगदान दिले आहे आहे,इतकेच नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती असो वा शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले आहे कोरोना काळात सुद्धा जिल्ह्यात व जिल्ह्य़ाबाहेरील अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजन युनिट व इतर उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत कंपनीने नेहमीच समाजाच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे आणि असेच अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपण्याची कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
More Stories
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन