राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लाइव्ह द्वारे दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते त्या नंतर अनेक व्यापारी संघटनांशी चर्चा करण्यात आल्यानंतर आज संबधित अधिकारी व मंत्र्यांची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली . त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला . राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल . तो सोमवारी सकाळी संपेल . दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत. जिल्हा बंदीचा निर्णय घेतलेला नाही

More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ