बार्शी शासनाने केलेल्या लॉकडाऊनला विरोध करत आंदोलन करण्यासाठी सर्व व्यापारी आज रस्त्यावर उतरले. या आंदोलनात शहरातील व्यापारी, व्यापारी संघटना सहभागी झाल्या . यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने सुभाषभाई बदामिया यांनी भूमिका मांडली.तसेच
शिवराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , बापु कदम यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर , भाजपा नेते राजेंद्र मिरगणे , विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी आपली मनोगत व्यक्त करत शासनाला दुकाने बंदचा निर्णयावर फेरविचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले व्यापाऱ्यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना ही निवेदन सादर करण्यात आले आहे


More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल