
चिपळूण शहर पूर्ण पाण्याखाली गेलं आहे वाशिष्टी नदीला आलेला पूर आणि कोयनेच वीज बनवून सोडलेलं पाणी एकत्र झाल्यावर पात्र सोडून शहरात घुसते दरवर्षी थोडया फार प्रमाणात असं होत पाऊस कोकणकरांना नवीन नाही पण आता पाऊस खूपच जास्त झाला आहे.
धक्कादायक घटना. कालपासूनजोरदार पडत असलेल्या पावसामुळे बावनदी आलेल्या महापुरामुळे कासार कोळवन पुल वाहून गेला आहे . त्यामुळे आजूबाजूच्या दहा गावासह तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
या वर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.त्यांना मदतीची आवश्यकता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’च्या २ टीम रवाना झाल्या.नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य वेगाने सुरु आहे.कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी तसेच फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करण्यात येत आहे.बचाव दलाचे जवान व हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल