उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील पाणी संकट वाढू लागले असून छोटे-छोटे जलस्त्रोत अटू लागल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढू लागली आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यातही घट होऊ लागली आहे.

राज्यातील धरणांमध्ये ३८.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठय़ासाठी जलसाठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी बैठकीत दिली.
राज्यातील उपलब्ध जलसाठा
अमरावती : ४५ टक्के, मराठवाडा : ४५ टक्के, कोकण : ४४ टक्के, नागपूर : ३५ टक्के, नाशिक : ३५ टक्के, पुणे : २८ टक्के
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात मागील काही वर्षांपासून चांगला पाऊस झाला त्यामुळे उन्हाळ्यात मायनस साठा असणारे उजनी प्लस मध्ये राहिले आहे. लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे त्यामुळे उजनी वर अवलंबून असणारे सोलापूर, बारामती, इंदापूर, पुणे, या भागात साध्या तरी बरी परिस्थिती आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार