

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात वैराग ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करत असल्याची अधिकृत घोषणा केली.या घोषणेच पत्र वैरागचे राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांना यावेळी देण्यात आले . याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील , संजय शिंदे . यशवंत माने आमदार , दीपक साळुखे पाटील उमेश पाटील,उत्तमराव जानकर , कल्याणराव काळे,बालाजी पवार आदी उपस्थित होते . या घोषणेमुळे अनेक दिवसांपासूनची असणारी वैरागकरांची नगरपंचायतीची मागणी पूर्ण झाली आहे.या घोषणेची वार्ता समजताच वैरागकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला .
More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांना राज्यस्तरीय नेचर केअर पुरस्कार
भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन