
शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार योजनेत सहभागासाठी २३ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
याआधीची मुदत ही 15 जुलै देण्यात आली होती.पण अनेक शेतकऱ्यांकडून योजनेशी संबंधित औपचारिक अपूर्ण राहिल्याने महाराष्ट्रात ही मुदतवाढ देण्यात आली. आता 23 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत सहभागी होता येणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी याबाबत आदेशाचे पत्र जाहीर केले आहे
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन