
अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.तसेच दहावीच्या गुणानुसारच अकरावीमध्ये प्रवेश दिले जावेत,असेही कोर्टाने राज्य सरकारला म्हटले आहे.सीईटीसंदर्भात राज्य सरकारने 28 मे रोजी अध्यादेश काढला होता.हा अध्यादेश कोर्टाने रद्द केला आहे.
सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही.त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.
More Stories
गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’, महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य
कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ सचिन वायकुळे यांना यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन