बार्शी, तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू नाहीत ते तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याना समक्ष भेटुन केली असता जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार याना याबत आदेश दिले आहेत.
माझी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यात झालेल्या नुकसानी बाबत चर्चा केली यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम बार्शी न.पा. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे उपस्थित होते

अति पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतातील उभ्या पिकाबरोबर काढून ठेवलेले धान तसेच शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे , नदी ओढे लगत च्या जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे शेतकरी अति पावसा च्या या संकटाने उध्वस्त झालेला आहे.
शासकीय पातळीवरून झालेल्या नुकसानी बाबत कोणत्याही दिलासादायक हालचाली नसल्याने नुकसानग्रस्त भयभीत आणि चिंताग्रस्त आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणांना पंचनाम्यासाठी आदेशीत करण्याची मागणी सोपल यांनी केली.
यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रांत अधिकारी निकम आणि तहसीलदार सुनील शेरखाने यांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले.
More Stories
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर