सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या पांढरी गावातील मुलांनी आपल्या शेतकरी वडिलांचे स्मारक उभारले आहे. हे स्मारक आजच्या काळामध्ये सर्वांनाच आदर्श निर्माण करणारे आहे.

प्रगतशील शेतकरी कैलासवासी मोहन घावटे यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घावटे कुटुंबाकडे सुरुवातीला केवळ पाच एकर जमीन होती.
मात्र मोहन घावटे आणि त्यांच्या भावाने आज ९० एकर जमीन कष्टाने आणि मेहनतीने कमवली. बार्शी बाजार समितीवर त्यांनी संचालक म्हणून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केलं होत. पंचक्रोशीमध्ये मोहन घावटे यांना मदतीला धावणारे आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखल जात. त्यांच्या निधनानंतर मुलगा गणेश घावटे आणि भावांनी मिळून. आपल्या वडिलांची आठवण कायम राहण्यासाठी सुंदर स्मारक उभारले आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार