Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे जिल्हाधिकारी व आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे जिल्हाधिकारी व आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे जिल्हाधिकारी व आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक
मित्राला शेअर करा

‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे’साठी वैराग येथील ट्रम्पेटसाठी स्क्वेअर मीटर दराने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे.यावर ७ ऑक्टोबरपूर्वी निर्णय होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १६) बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत व वैराग येथील दहा गटातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या भूसंपादनासाठी हेक्टरप्रमाणे दर न देता स्क्वेअर मीटर दराने दर देण्याची मागणी केली. आ. राजेंद्र राऊत यांनीही यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली.

बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यातील
शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी संपादित करण्यात येत आहेत.
भूसंपादनासाठी देण्यात येणारा दर चुकीच्या पध्दतीने देण्यात येत असून, शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी देण्यात येणारा दर चुकीच्या पध्दतीने देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी नाराज असून वारंवार तक्रारी करत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीस सदोष पध्दतीने कमी दर दिला जात आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी भूसंपादनासाठी आलेला मोबदला नाकारून भूसंपादनास विरोध करीत आहेत.

बार्शी तालुक्यातील वैराग, लक्ष्याची वाडी येथील शेतकऱ्यांची कमी दर मिळत असल्याची तक्रार आहे. लगतच्या शेतकऱ्यास स्क्वेअर मीटर दराने दर देण्यात आला आहे. मात्र, त्याच्या बाजूलाच असणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरीप्रमाणे कमी दर देण्यात आले असल्याची माहिती या वेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.

जमिनीचे दर ठरविण्याचे अधिकार मूल्यांकन विभागाला आहेत. मूल्यांकन विभागाकडूनच जमिनीचे दर ठरविले जातात. त्यामुळे दरवाढीचा निर्णय केंद्र शासनाकडे असल्याची माहिती यावेळी भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.

दरवाढीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे तातडीने सादर करण्यात यावा, अशी सूचना यावेळी आ. राजेंद्र राऊत यांनी केली. शेतकऱ्यांची बैठकीत वैराग येथील शेतकऱ्यांनी आहेत. सुरत-चेन्नई महामार्गासाठी देण्यात आले असल्याची माहिती मागणी लक्षात घेत तातडीने दरवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचा निर्णय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. नवा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील तपासणी टीम माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना दिली.


शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेतकर्‍यांना भूसंपादनसाठी देण्यात येणारा दर चुकीच्या पद्धतीने देण्यात येत असून दरवाढीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे तातडीने सादर करण्यात यावा, अशी सूचना यावेळी आ. राजेंद्र राऊत यांनी केली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत तातडीने दरवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचा निर्णय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. नवा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील तपासणी टीम सोलापूरला येईल 7 ऑक्टोबरपूर्वी हा विषय मार्गी लावण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेकडून होत आहे. यासाठी गतीने भूसंपादनही करण्यात येत आहे.


शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बार्शी तालुक्यातील लक्ष्याची वाडी हे गाव बार्शी परंडा रस्त्यावरील पहिले गाव आहे. गाव बार्शी शहरालगतच आहे. यापूर्वी या गावातील शेतकऱ्यांच्या शेती बिगरशेती झाल्या असून, तसे नकाशेही उपलब्ध आहेत. त्यामुळे याठिकाणी यापूर्वीच गुंठेवारी सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे नकाशे नाहीत, त्यांना हेक्टरी प्रमाण धरून दर देण्यात आले आहेत. या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.