अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दि. ०५/०८/२०११ पासुन लागु करण्यात आला आहे. सदर कायदयाचा प्रमुख उद्देशाने जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपल्ब्ध करुन देणे हा आहे.
अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न व्यवसायिक हे वडापाव , पोहे या सारखे अन्न पदार्थ सर्रास न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते ( डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल ) या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. अशा न्युजपेपरमध्ये गरम खादयपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे . त्यामुळे भारतीय खादय सुरक्षा मानके प्राधिकरण ( FSSAI ) भारत सरकार यांनी दि ०६/१२/२०१६ आदेश निर्गमित केले आहेत.

यामध्ये सर्व अन्न व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात आले आहे की, न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. असे अन्न व औषध प्रशासन ( म.रा ) पुणे विभाग सह आयुक्त् ( अन्न ) शी. म. देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत