महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमदार राजाभाऊ राऊत यांनी, उर्जा मंत्री मा. नितीन राऊत यांना, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत ईमेल द्वारे पत्र पाठवून, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केली आहे.

यावर जर यशस्वी तोडगा निघाला नाही तर, बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, आघाडी सरकारच्या विरोधात अधिवेशन काळात बार्शीत भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडीत केली असून, तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांचे वीज बील माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणेकामी संबंधीतांना आदेश करण्याची विनंती आमदार राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ