सोलापूर, : अनेक पिढ्यापासून गायरान जमिनीवर असलेला ग्रामस्थांचा हिरावून घेऊ नये. राज्यात लाखोंच्या संख्येने असलेल्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ नये. शासनाने गायरान जमिनीवरील निवासी वापर तातडीने नियमाधीन करावा, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. या मागणीचे निवेदन परिषदेच्यावतीने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.

यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके-पाटील, पंडित ढवण, कुलदीप कौलगे यांच्यासह प्रमुख निवारा पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकांना बेघर होऊ देणार नाही. काळजी करू नका, निवासी अतिक्रमणे नियमाधीन करू, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी दिली. गायरान जमिनीचा निवासी प्रयोजनाचा वापर नियमित करण्याबाबत शासनाकडून वारंवार सूचना व आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे गायरान जमिनीवर बांधलेली घरे व निवासी वापर नियमाधीन झाला नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार