विज्ञानातील संशोधनाबरोबर भाषेतील संशोधनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुल आणि संगमेश्वर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
‘हिंदी भाषा आणि साहित्य : स्थिती, गती व प्रक्रिया’ या विषयावर त्यांनी आपले मार्गदर्शक विचार व्यक्तकेले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी होते. प्राचार्या डॉ. शोभा राजमान्य, डॉ. गिरीश काशीद, डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भाषेतील संशोधन हे केवळ ग्रंथालयीन नसते तर त्याला विविध आयाम असतात. ग्रंथालयीन संशोधनासोबत क्षेत्रीय संशोधनही महत्त्वाचे असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार