विज्ञानातील संशोधनाबरोबर भाषेतील संशोधनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुल आणि संगमेश्वर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
‘हिंदी भाषा आणि साहित्य : स्थिती, गती व प्रक्रिया’ या विषयावर त्यांनी आपले मार्गदर्शक विचार व्यक्तकेले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी होते. प्राचार्या डॉ. शोभा राजमान्य, डॉ. गिरीश काशीद, डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भाषेतील संशोधन हे केवळ ग्रंथालयीन नसते तर त्याला विविध आयाम असतात. ग्रंथालयीन संशोधनासोबत क्षेत्रीय संशोधनही महत्त्वाचे असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल