
सोलापूर : सोलापुरातील नामांकित कंपनी बालाजी अमाईन्सने आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत पूरग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने दि २९ जुलै २०२१ रोजी रु १ कोटीचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला.
कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने CSR अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने आजपर्यंत शिक्षण,क्रिडा आरोग्य व स्वछता , जलपुरवठा व जल संवर्धन क्षेत्रात आपले योगदान दिले आहे आहे,इतकेच नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती असो वा शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले आहे कोरोना काळात सुद्धा जिल्ह्यात व जिल्ह्य़ाबाहेरील अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजन युनिट व इतर उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत कंपनीने नेहमीच समाजाच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे आणि असेच अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपण्याची कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर