
अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची लढाई मोहिते पाटील यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जिंकली आहे. गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाला फळ आले आहे.परंतु शासनाचा प्रत्यक्षात आदेश मिळेपर्यंत उपोषण न संपविण्याचा आंदोलन कर्त्यांचा विचार आहे अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीचा अंतिम अध्यादेश तीन आठवड्यात काढून त्याबाबत कळवावे,असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.मात्र आदेश मिळेपर्यंत उपोषण सुरू रहाणार आहे
अकलूज येथे नगरपरिषद,तर नातेपुते येथे नगरपंचायत होणार, हे आता निश्चित झाले आहे.

दरम्यान,अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर नगरपरिषदेसाठी गेल्या २६ दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे.या उपोषणस्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार प्रशांत परिचारक,आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाजपच्या नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा देत उपस्थिती दर्शविली होती.
More Stories
गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’, महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य
कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ सचिन वायकुळे यांना यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन