बिग ब्रेकिंग – अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे . देशमुख यांनी ट्विटर वरती आपल्या राजीनामा जाहीर केला आहे पोलिसांना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट आदेश दिले असे आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे व ते न्यायालयात ही गेले आहेत. या आरोपांची सीबीआयने चौकशी करावी , असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत . त्यानंतर चौकशी होत
मा . उच्च न्यायालय , मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ०५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय. मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत . त्यानुषंगाने मी , मंत्री ( गृह ) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही , म्हणून मी स्वत : हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे . सबब , मला मंत्री ( गृह ) या पदावरुन कार्यमुक्त करावे ,
अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन