
कोविडचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ई-बैठक घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख इत्यादी मंत्री उपस्थित होते.
या वेळी निर्बंध लावण्यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढविणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे निर्देश देण्यात आले
आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल. आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी कडक निर्बंध लावावेच लागतील. महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण प्रधानमंत्र्यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्र शासनाने त्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे राजेश टोपे यांनी स्वागत केले
More Stories
भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन