राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लाइव्ह द्वारे दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते त्या नंतर अनेक व्यापारी संघटनांशी चर्चा करण्यात आल्यानंतर आज संबधित अधिकारी व मंत्र्यांची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली . त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला . राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल . तो सोमवारी सकाळी संपेल . दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत. जिल्हा बंदीचा निर्णय घेतलेला नाही

More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश