वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार आणि रविवारी जाहीर केलेला बाजारपेठ बंदचा निर्णय हा व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडणारा आहे . त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा , अशी मागणी बार्शी व्यापारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे . व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा म्हणाले , जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी लागू केलेला शनिवार आणि रविवारचा लॉकडाऊन हा बंद करण्यात यावा . या निर्बधांना केवळ आमचाच विरोध नसून सर्व व्यापाऱ्यांचा विरोध आहे . बँकांचे हप्ते , कामगारांचा पगार , प्रशासनाचे कर या सर्व गोष्टींचा भार पडून व्यापारी देशोधडीला लागला आहे . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या आदेशात बदल करण्याची आणि व्यापार पूर्ववत करण्याची मागणी केली आहे .
साध्या आरोग्य विभागा मार्फत प्रतेक दुकानात जाऊन व्यापारी व कामगारांच्या चाचण्या केल्या जात आहेत. वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता या मागणीला कितपत यश मिळेल याकडे सर्व व्यापारी व बाजारपेठेचे लक्ष लागलेले आहे
More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन