गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात काही भागात नागरिक वाढत्या तापमानाने त्रस्त असताना काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

येत्या 48 ते 72 तासांमध्ये मान्सून (monsoon) केरळ मध्ये लावेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात 30 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. मान्सूनपूर्व पावसामुळे,सोयाबीन, द्राक्ष, आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं.
महाराष्ट्रात साधारण 7 ते 10 जूनच्या दरम्यान मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, वेळेआधीच मान्सून धडकणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत