बार्शी:- समाजात कान असूनही जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी न ऐकणारे, नि तोंड असूनही जाणीवपूर्वक न बोलणारे हेच खरे कर्णबधीर असतात, असे मत लेखक सचिन वायकुळे यांनी व्यक्त केले.

इंडीयन रेडक्रॉस संचलित बधीरमुख विद्यालयात टपाल तिकीट संग्राहक उदय पोतदार यांनी जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त ४१ देशातील पोस्ट तिकीट प्रदर्शन आयोजित केले होते.
याप्रसंगी वायकुळे बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव संतोष सुर्यवंशी, उद्योजक धीरज कुंकुलोळ, उदय पोतदार, सुनील फल्ले, सायरा मुल्ला, मुख्याध्यापक मुळे उपस्थित होते.
जीवनात आपल्या वाट्याला पैसा यावा, संपत्ती यावी असे प्रत्येकाला वाटते. यामुळे माणूस श्रीमंत होईल, मात्र पैशांपेक्षा जीवन समृध्द करणारे आई वडील वाट्याला यायला हवेत, असे सांगून या मुलांच्या कलागुणांचे वायकुळे यांनी कौतुक केले.यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्या मुलांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी पोतदार, मुल्ला, शिक्षक गवारे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षिका मंजुषा काटकर यांनी प्रास्तविक केले तर मुख्याध्यापक मुळे यांनी आभार मानले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ