
अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.तसेच दहावीच्या गुणानुसारच अकरावीमध्ये प्रवेश दिले जावेत,असेही कोर्टाने राज्य सरकारला म्हटले आहे.सीईटीसंदर्भात राज्य सरकारने 28 मे रोजी अध्यादेश काढला होता.हा अध्यादेश कोर्टाने रद्द केला आहे.
सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही.त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल