बार्शी – येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड 6 पदरी महामार्गाबाबत शेतकरी बंधुच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करणेबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकारी यांचेसोबत चर्चा आयोजित केली होती त्यावेळी, आमदार राजेंद्र राऊत हेही उपस्थित होते.

यावेळी या महामार्गात जाणाऱ्या जमिनी व त्यांना मिळणारा मोबदला, सदरील मार्ग कोणत्या गटातून व नेमके कुणाचे किती क्षेत्र जाणार याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच या मार्गामुळे शेतकऱ्यांना शेतातील रस्त्याच्या अडचणी, पाईपलाईनच्या समस्या, तसेच या मार्गावर होणारे टोल व त्याबाबच्या सुविधा अशा अनेक समस्यांवर चर्चा व उपाययोजना काय आहेत, यावर अधिकारी वर्गांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या मनात असणाऱ्या शंका व समस्या याचे निराकरण व समाधान करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक चिटणीस, भूसंपादन अधिकारी राजकुमार माने, भूसंपादन अधिकारी सोलापूर, तहसीलदार तुळजापूर सौदागर तांदळे, बार्शी तहसीलदार शेरखाने, तहसीलदार परंडा, भूमी अभिलेखचे मानेही उपस्थित होते.
More Stories
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर