सोलापूर, दि. 30 : जिल्ह्यासाठी मृग बहारामध्ये डाळिंब, लिंबू, मोसंबी, पेरु, चिक्कू व सिताफळ फळपिके अधिसुचित करण्यात आली आहेत. पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

पुनर्रचितमध्ये डाळिंब व सिताफळ या पिकांची फळपिक विमा भरण्याची मुदत अनुक्रमे 15 जुलै व 31 जुलै 2022 पर्यंत आहे. मुदतीत शेतकरी बांधवांनी पीक विमा भरावा. 1 जुलै ते 7 जुलै 2022 या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इंडिया @ 75 मोहिमेअंतर्गत तिसरा पीक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेसाठी शेतकरी मेळावे व शेतकरी विमा पाठशाळा कार्यक्रमांचे आयोजन तालुका व ग्रामपातळीवर करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत