उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णतः कृषी क्षेत्राशी निगडित असून शेतीसाठी योग्य व शाश्वत पाणी पुरवठा व्हावा यासाठी बोरी धरण, मांजरा धरण यासह जिल्ह्यातील मोठे पाणी साठे असलेल्या ठिकाणी बंद पाईपलाईन योजना राबवावी तसेच यासाठी एकात्मिक आराखडा तयार करून केंद्र व राज्य सरकार कडून निधी मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.
शेतकरी बांधवांना शाश्वत पाणी मिळावे आणि सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी बंद पाइपलाइन योजना मोठ्या पाणी साठ्याच्या ठिकाणी आवश्यक ठरते. उस्मानाबादचे अर्थकारण हे शेती भोवती फिरते. जर शेतीला पुरेसे पाणी असेल तर शेती आणि पर्यायाने उस्मानाबादच्या समृद्धी मध्ये वाढ होईल.

त्यामुळे उस्मानाबादच्या समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक ‘बंद पाइपलाइन योजने’साठी विधिमंडळात मुद्दा मांडत मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्ह्यात जेथे मोठे पाणी साठे आहेत तेथे बंद पाईपलाईन योजना राबविण्याची मागणी याआधी दि.२१/०१/२०२१ रोजी जलसंपदा मंत्री ना.श्री.जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी असून नीती आयोगाने घोषित केलेल्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. अशा योजना राबविण्यात आल्या तर शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळेल आणि सिंचन क्षेत्र वाढेल.
बंद पाईपलाईनचे महत्व अधोरेखित करत आपण केलेली ही सूचना योग्य असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील यांनी राज्यात इस्थळ, जि.बीड, तांदुळजा, जि.लातूर व तट बोरगाव, जि.उस्मानाबाद येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या विषयाचा नीती आयोगाकडे प्रस्ताव देण्यासाठी आग्रही पाठपुरावा करणार आहोत असे ते म्हणाले.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
कोरफळे येथील शेतकरी निलेश पवार यांनी दिले हरणाचे पाडस जीवदान