कोरोनामुळे मागील दोन वर्षे विद्यापिठ बंद होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा विद्यापीठे, महाविद्यालये सुरु व्हावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान आज उदय सामंत यांनी याबाबत ट्विट करत निर्णय जाहीर केला आहे.
ट्विटर वर दिली माहिती
कोरोनामुळे गेली दोन वर्षे बंद असणारी विद्यापीठे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत.
त्यांनी सांगितले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) ३७ कोटी ५८ लाख ३३ हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच मध्यंतरी प्राध्यापक भरतीचे महाराष्ट्र शासन राजपत्र ही प्रसिद्ध झाले आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार