राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लाइव्ह द्वारे दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते त्या नंतर अनेक व्यापारी संघटनांशी चर्चा करण्यात आल्यानंतर आज संबधित अधिकारी व मंत्र्यांची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली . त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला . राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल . तो सोमवारी सकाळी संपेल . दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत. जिल्हा बंदीचा निर्णय घेतलेला नाही

More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर