बार्शी शासनाने केलेल्या लॉकडाऊनला विरोध करत आंदोलन करण्यासाठी सर्व व्यापारी आज रस्त्यावर उतरले. या आंदोलनात शहरातील व्यापारी, व्यापारी संघटना सहभागी झाल्या . यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने सुभाषभाई बदामिया यांनी भूमिका मांडली.तसेच
शिवराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , बापु कदम यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर , भाजपा नेते राजेंद्र मिरगणे , विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी आपली मनोगत व्यक्त करत शासनाला दुकाने बंदचा निर्णयावर फेरविचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले व्यापाऱ्यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना ही निवेदन सादर करण्यात आले आहे

More Stories
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा