

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात वैराग ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करत असल्याची अधिकृत घोषणा केली.या घोषणेच पत्र वैरागचे राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांना यावेळी देण्यात आले . याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील , संजय शिंदे . यशवंत माने आमदार , दीपक साळुखे पाटील उमेश पाटील,उत्तमराव जानकर , कल्याणराव काळे,बालाजी पवार आदी उपस्थित होते . या घोषणेमुळे अनेक दिवसांपासूनची असणारी वैरागकरांची नगरपंचायतीची मागणी पूर्ण झाली आहे.या घोषणेची वार्ता समजताच वैरागकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला .
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर