

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात वैराग ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करत असल्याची अधिकृत घोषणा केली.या घोषणेच पत्र वैरागचे राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांना यावेळी देण्यात आले . याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील , संजय शिंदे . यशवंत माने आमदार , दीपक साळुखे पाटील उमेश पाटील,उत्तमराव जानकर , कल्याणराव काळे,बालाजी पवार आदी उपस्थित होते . या घोषणेमुळे अनेक दिवसांपासूनची असणारी वैरागकरांची नगरपंचायतीची मागणी पूर्ण झाली आहे.या घोषणेची वार्ता समजताच वैरागकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला .
More Stories
वाशी (जि. धाराशिव) येथे शासकीय आयटीआय जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सानिध्यात संपन्न