माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा विक्रमी टप्पा पार केला असून २५ लाख मे. टन किंवा त्याच्या जवळपास ऊस गाळप केले जाईल, असा अंदाज आहे.

कारखान्याकडे नोंदल्या गेलेल्या एकूण ऊसापैकी अद्याप दीड ते दोन लाख मे. टन ऊस गळीतासाठी शेतात उभा आहे, परंतु शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वास ठेवावा धीर सोडू नये कारण ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा कार्यरत आहे व संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
More Stories
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर