माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा विक्रमी टप्पा पार केला असून २५ लाख मे. टन किंवा त्याच्या जवळपास ऊस गाळप केले जाईल, असा अंदाज आहे.

कारखान्याकडे नोंदल्या गेलेल्या एकूण ऊसापैकी अद्याप दीड ते दोन लाख मे. टन ऊस गळीतासाठी शेतात उभा आहे, परंतु शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वास ठेवावा धीर सोडू नये कारण ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा कार्यरत आहे व संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार