माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात २३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा विक्रमी टप्पा पार केला असून २५ लाख मे. टन किंवा त्याच्या जवळपास ऊस गाळप केले जाईल, असा अंदाज आहे.

कारखान्याकडे नोंदल्या गेलेल्या एकूण ऊसापैकी अद्याप दीड ते दोन लाख मे. टन ऊस गळीतासाठी शेतात उभा आहे, परंतु शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वास ठेवावा धीर सोडू नये कारण ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा कार्यरत आहे व संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार