केंद्र सरकारने 2019 साली राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त नोकरदारांनाच लाभ घेता येत होता पण आता या योजनेत सुधारणा करण्यात आली असून शेतकऱ्यांसह छोट्या दुकानदारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे व या योजनेत मासिक 3000 रुपये पेन्शन मिळू शकते.

कोणाला मिळेल पेन्शन ?
राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत किरकोळ व्यापारी, दुकानदार व स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमान 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
तसेच यायोजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीने नाॅमिनी केलेल्या व्यक्तीला ( वारसाला) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि जन-धन खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी नियम व अटी
राष्ट्रीय पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे. तसेच 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत नोंदणी करु शकतात
अर्ज करण्यासाठी खालील लिंक पहा
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार