ऊसाचा दर जाहीर करा , अशी मागणी करत विज बिल वसुलीचा निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन केले जाईल , असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी करमाळा तालुक्यातील तीन साखर कारखान्यांना दिला आहे .
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , शेतकन्यांचा ऊस उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे . रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत . इंधन दरवाढीमुळे मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे . त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे . या ऊलट साखरेचे वाढलेले दर व उपपदार्थाला वाढलेली मागणी पहाता सध्या कारखान्यांना चांगले दिवस आले आहेत त्यातच ब्राझील सारख्या देशात कमी झालेले साखरेचे उत्पादन . त्यामुळे जागतीक बाजारात साखरेचे दर 40 च्या पुढे गेले आहेत . त्यामुळे कारखान्यांनी कायद्याप्रमाणे एक रकमी एफआरपी दिल्यास शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघणार आहे . तरच शेतकरी टिकेल व कारखाने बंद झाल्यानंतर अधिकचे 300 रु शेतकन्यांना द्यावेत . एक रकमी एफआरपीमुळे शेतकन्यांना त्यांचे कर्ज नवे जुने करता येईल .

म्हणून विचारपूर्वक जयसिंगपुर येथील ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एफआरपी अधिक 300 रुपयेचा ठराव झालेला आहे . ऊस दर देण्यामध्ये सोलापूर जिल्हा हा कोल्हापूरच्याच नव्हे तर मराठवाड्याच्याही मागे आहे . तरी कमलाई साखर कारखाना पांडे , भैरवनाथ साखर कारखाना विहाळ व मकाई सहकारी साखर कारखाना या तीनही साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक 300 चा दर जाहीर करावा , अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे .
साखर आयुक्त व कारखानदार यांच्यात विजबिला संदर्भात आनलाईन बैठक झाली आहे . त्या बैठकीला सर्व कारखानदारांनी उपस्थित राहुन एक मुखाने ऊसबीलातून विज बिल कपात करण्याचा साखर आयुक्तांनी निर्णय घेतला . त्या निर्णयाचा साखर आयुक्त व कारखानदार यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी तिव्र निषेध केला आहे . शेतकऱ्याच्या ऊसबिलातुन वीज बिल वसूल करण्याचा कोणताही कायदा नसताना अशी सक्तिची विज बिल बेकायदेशीर वसुली संबंधित शेतकन्यांच्या संमतीशिवाय करू नये , असे केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देण्यात आला आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे , करमाळा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके , तालुका युवाअध्यक्ष अमोल घुमरे , बापू फरतडे , जातेगाव शाखाध्यक्ष अशोक लवंगारे उपस्थित होते.
More Stories
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न