सोलापूर: जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन पीएम किसान योजनेच्या नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार सोलापूर यांनी केले आहे.

तालुका नोडल अधिकारी तथा तहसीलदार यांनी कृषि विभाग व ग्रामविकास यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवावी. पी.एम किसान पोर्टलवरील नोंदणीकृत सर्व पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया 31 जुलै 2022 पर्यंत पूर्ण करावी. विहित मुदतीत ओटीपी बेस्ड किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे
https://pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
या पोर्टलवरील पर्यायामार्फत तत्काळ पूर्ण करण्याचे आवश्यक नियोजन करावे. योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्रीमती पवार यांनी केल्या आहेत.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार