राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती आहेत त्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंच योग्य रीतीने सांभाळत आहेत.

कुटुंबाचा सांभाळ करीत गावचा कारभार पाहणाऱ्या महिला सरंपचांना गावासाठी आता राज्य सरकारकडून दरवर्षी दहा लाखांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार
वित्त विभागाकडे प्रस्ताव
ग्रामविकास विभागाने प्राथमिक स्वरूपात ही योजना तयार केली असून आता ती वित्त व नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना ठेवली जाईल आणखी या योजनेला नेमके कोणाचे नाव द्यायचे हे अजूनही निश्चित झालेले नाही.
ग्रामविकास विभागाने या योजनेचा प्रस्ताव तयार केला असल्याने महिला सरपंचाना गावचा विकास करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार