राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती आहेत त्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंच योग्य रीतीने सांभाळत आहेत.

कुटुंबाचा सांभाळ करीत गावचा कारभार पाहणाऱ्या महिला सरंपचांना गावासाठी आता राज्य सरकारकडून दरवर्षी दहा लाखांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार
वित्त विभागाकडे प्रस्ताव
ग्रामविकास विभागाने प्राथमिक स्वरूपात ही योजना तयार केली असून आता ती वित्त व नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना ठेवली जाईल आणखी या योजनेला नेमके कोणाचे नाव द्यायचे हे अजूनही निश्चित झालेले नाही.
ग्रामविकास विभागाने या योजनेचा प्रस्ताव तयार केला असल्याने महिला सरपंचाना गावचा विकास करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ